भारतीय समुदायातील ग्रामीण समुदाय हा आकाराने मोठा असून त्याचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन हे कृषी व कृषिपूरक व्यवसाय हे आहेत. पूर्वी ग्रामीण भागात पारंपारिक शेती व्यवस्था याला अधिक अग्रक्रम दिल्या जात असे. त्यात अठरा अलुतेदार (नारू) आणि बारा बलुतेदार (कारू) यांच्या सहयोगाने शेती व ग्रामीण संस्कृती ही संरचित झालेली असून त्यानुसार कृषी जीवन व्यतीत केले जात होते. एकविसाव्या शतकात भारतीय कृषी व्यवस्थेची संरचना बदललेली असून त्यामध्ये मनुष्यबळ यापेक्षा यांत्रिकीकरण, आधुनिक शेती, चलनी शेती याकडे कल वाढलेला दिसून येतो.

Podden och tillhörande omslagsbild på den här sidan tillhör Dr. Seema Shete-Nawlakhe. Innehållet i podden är skapat av Dr. Seema Shete-Nawlakhe och inte av, eller tillsammans med, Poddtoppen.