शाळेतील मुलांमध्ये वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ही पालकांपुढची नवी समस्या आहे. ग्रामीण भागात तर त्यासाठी पूरक वातावरणही नसते. वाचन कमी होण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यात समाज म्हणून आपण काही करण्याची गरज आहे, हे ओळखून पुण्यातील बालक-पालक फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षांपासून ग्रामीण भागातील मुलांसाठी `वाचन साखळी` संकल्पना रुजते आहे. या संकल्पनेचे प्रणेते विनायक जोशी यांना याच बाबत बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे यांनी. ही संकल्पना नेमकी काय आहे, त्यातून मुलांचं पुस्तकांशी नातं कसं जोडलं जातं, कोणती पुस्तक त्यांना वाचायला मिळतात, त्यांचा प्रतिसाद कसा असतो अशा अनेक बाबींची उकल या संवादातून होते. नव्या पिढीची बौद्धिक मशागत करु पाहणाऱ्या या उपक्रमाची व्याप्ती वाढण्यासाठी त्यात समाजाचा सहभागही वाढायलाच हवा, त्यासाठी काय करावे हे देखील या संवादातून स्पष्ट होते. प्रत्येकाने जरुर ऐकावा आणि आपल्या परीने इतरांपर्यंत हा विचार, हा उपक्रम पोहोचवावा आणि वाचन-साखळीचा दुवा बनावे.
Podden och tillhörande omslagsbild på den här sidan tillhör
Santosh Deshpande. Innehållet i podden är skapat av Santosh Deshpande och inte av,
eller tillsammans med, Poddtoppen.